आपण आपल्या कुटुंबातील सदस्यांना सांगावे की, दिवसातून किमान एक वेळचे जेवण तरी सर्वजण एकत्र बसून करावे. साधारण सायंकाळी जेवणाची वेळ निश्चित करावी. कारण ती वेळ सगळ्यांना सोयीची असते. जेवणाच्या वेळी घरातील सर्व सदस्यांनी एकत्र जमावे व जेवण करावे. जर यासाठी कुटुंबातील एखाद्या सदस्यांची वाट पाहावी लागत असेल तर जरूर पाहावी. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांमधील नातेसंबंध अधिक दृढ होतात. हे लक्षात घ्या की, कुटुंबातील सर्वजण एकत्र बसून जेवण करतात, त्या कुटुंबातील लोक मिळून-मिसळून एकत्र राहतात.