पुदिना व कढीलिंबाची पाने उन्हात वाळवून त्याची पूड करून ठेवावी. आमटी किंवा भाजीत घातल्यास चांगला सुवास व चव येते. टोमॅटो सूप घट्ट होण्यासाठी त्यात थोडा भिजलेला साबुदाणा घालावा. दहीवडे बनवताना वाटलेल्या डाळीत थोडे दही टाकावे. दहीवडे मऊ होतात व तेल जास्त शोषत नाहीत.