| | मुंबईत झालेल्या हल्ल्याला आता आठवडा उलटत आला आहे. या हल्ल्यांचे घाव मुंबईच नाही तर भारतातील प्रत्येक नागरिकांच्या मनावर इतके खोलवर झाले आहेत, की ते भरून यायलाही पुष्कळ काळ जावा लागणार आहे, यात शंका नाही. मुंबईतील हल्ल्यांचा तपास आता द्रुतगतीने सुरू असला तरी या एकूण घटनेचे असे काही पैलू आहेत, ज्यामागची कारणमीमांसा कळलेली नाही. दहशतवाद्यांचा खात्मा झाला असला तरी ते जाताना आपल्या पुढ्यात अनेक प्रश्न ठेवून गेलेत.
* मुंबई पोलिसांनी स्पष्ट केल्याप्रमाणे जर फक्त दहाच दहशतवादी मुंबईत दाखल झाले असतील, तर मुख्यमंत्री विलासराव देशमुख
आणि आबांनी हल्ला झाला त्या दिवशी दहशतवाद्यांची संख्या छातीठोकपणे आधी.... |