कुठल्याही नेत्याने कुठल्याही देशाचा दौरा केल्याने नेपाळ आणि भारताच्या दृढ संबंध तुटणे शक्य नाही असे स्पष्ट करतानाच भारताने माझ्या चीन दौ-यामुळे काळजी करण्याची गरज नाही, असे नेपाळचे माजी पंतप्रधान आणि सीपीएन-माओवादीचे अध्यक्ष पुष्पकमल दहल तथा प्रचंड यांनी स्पष्ट केले आहे.
कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते धीरेंद्र प्रताप यांच्या भेटी दरम्यान प्रचंड यांनी ही बाब स्पष्ट केली.
प्रचंड म्हणाले, की भारत आणि नेपाळ दोन्ही देशांतील संबंध अतिशय जुने आणि दृढ असून त्यांना वेगळे केले जाऊ शकत नाही.