बजरंग दलाच्या गो रक्षा विभागाचे जिल्हा प्रमुख दीनदयाल शर्मा यांच्या हत्ये प्रकरणी पोलिसांनी चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून, एका व्यक्तीस अटक केली आहे. शर्मा यांच्या हत्येनंतर शहरात तणावाचे वातावरण कायम आहे.
पोलिसांनी निशातपुरा आणि इतर भागात सुरक्षा वाढवली आहे. शर्मा बुधवारी मारुती मंदिरात आरती करत असताना त्यांच्यावर काही जणांनी प्राणघातक हल्ला केला होता. यात शर्मा यांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर निशातपुरा भागात अतिरिक्त पोलिस दल तैनात करण्यात आले होते.