युतीने राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीनंतर राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी केल्यानंतर आता राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी येत्या ४८ तासांमध्ये राज्य सरकार स्थापन करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे.
निवडणुकांचा निकाल लागल्यापासून मंत्रिपदांवरून राष्ट्रवादी आणि कॉग्रेसमध्ये जुंपली आहे. कोणाला कोणते खाते, यावरून उभय पक्षांचे एकमत न झाल्याने राज्यात अस्थिर वातावरण निर्माण झाले आहे.
या दोन पक्षांच्या भांडणाचा फायदा घेत युतीने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. राष्ट्रपतींनी त्यांची मागणी फेटाळून लावली नसली तरी ती फारशी गांभीर्यानेही घेतलेली नाही.
WD
WD
राज्यात गुप्त खलबतांना उधाण आले असतानाच सरकार नेमके कुणाचे स्थापन होणार असाही प्रश्न विचारला जात आहे. मुंबई पासून ते राज्याच्या काना-कोपऱ्यापर्यंत अफवांना उधाण आले आहे.
या साऱ्या परिस्थितीमुळे राज्याचे नाव खराब झाले आहे. राष्ट्रवादीशी सरकार स्थापने संदर्भात चर्चा सुरू असून, आगामी ४८ तासांमध्ये सरकार स्थापन करीनच असे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटल्याने पुन्हा एकदा राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे.