कोणत्याही कारणांचा दोष भारताचा माथी मारण्याची पाकिस्तानची जुनी सवय अजूनही कायम आहे. यामुळे विश्वकरंडक स्पर्धेचे यजमानपद गेल्याचे खापर पाकिस्तानने भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर (बीसीसीआय) फोडले आहे.
पाकिस्तानचे क्रीडामंत्री पीर आफताब शाह जिलानी यांनी सांगितले की, बीसीसीआयने आणलेल्या दबावामुळे पाकिस्तानकडून सन 2011 मध्ये होणार्या विश्वकरंडक स्पर्धेचे यजमानपद आयसीसीने काढून घेतले. पाक मंडळाने हे प्रकरण चांगल्या पध्दतीने हताळले नाही, अशी टीका त्यांनी केली. |