ओळख क्रिकेटपटूंची | आकडे बोलतात | T-20 वर्ल्डकप-09 | सचिन तेंडुलकर | चॅम्पियन्स करंडक-09 | लेख | क्रिकेट वृत्त | क्रिकेट टिकर
मुख्य पृष्ठ » क्रीडा जगत » क्रिकेट » क्रिकेट वृत्त » विजयाचे श्रेय गोलंदाजांना: पॉंटिग
Feedback Print Bookmark and Share
 
चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा 24 धावांनी पराभव करुन मालिकेत पुनरागमनाचे श्रेय ऑस्ट्रेलियाचा कर्णधार रिकी पॉंटिग याने गोलंदाजांना दिले. 250 धावसंख्या असताना भारतीय फलंदाजांना रोखण्यात गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांनी मोलाची कामगिरी केली, असे मत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार रिकी पॉंटिग याने व्यक्त केले.

भारताला विजयासाठी 251 धावांचे लक्ष्य देवून 46.4 षटकात 226 धावांवर रोखले. त्याबद्दल बोलताना पॉंटिग म्हणाला की, आमचे वेगवान गोलंदाज आणि क्षे‍त्ररक्षकांनी अपेक्षा पूर्ण केल्या. मोहाली सारख्या खेळपट्टीवर आम्ही 300 धावा करु शकलो असतो, परंतु फलंदाजांची ही कमतरता गोलंदाजांनी दूर केली. मालिका आता 2-2 ने बरोबरीत आली असून इतर तीन सामनेही महत्वपूर्ण असल्याचे पॉंटिगने सांगितले.
संबंधित माहिती शोधा